पाकिस्तानचा उदोउदो करणार्‍या ४२ जणांना आसाममध्ये अटक   

गुवाहाटी :  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर  पाकिस्तानचा उदोउदो करणारर्‍या ४२ समर्थकांना आसााममध्ये अटक करण्यात आली. भारतीय भूमीवर राहून देशाच्या विरोधात भूमिका घेणार्‍यावर कारवाई झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी दिली. 
 
बारपेटा, होजाई आणि चरंग जिल्ह्यातील प्रत्येकी एकाला अटक केली असल्याचे सर्मा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये नमूद केेले. आतापर्यंत एकूण ४२ जणांना अटक केल्याचे ते म्हणाले. यापूर्वी एआययूडीएफचा आमदार अमिनूल इस्लामला पकडले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर त्याने पाकिस्तानची तळी उचलली होती. पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणार्‍यांच्या तंगड्या तोडण्यात येतील, असा इशारा सर्मा यांनी दिला होता. 
 
पाकिस्तान आणि दहशतवादाविरोधातील लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि लष्कराचे यांचे हात बळकट करा, असे आवाहनही त्यांनी केले होते. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात लपले असले तरी त्यांना शोधून काढून त्यांच्या तंगड्या तोडल्या जातील, असेही ते म्हणाले. 

Related Articles